मोदींच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. ५ :- रशिया आणि युक्रेनमधील मागील दहा दिवसा पासुन युद्ध सुरू आहे या संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. आज ही आपले भारतीय हजारो मुलं तेथे अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. त्यात दोन मुले ही गोळीबार मध्ये मृत्युमुखी पडले अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात मेट्रो उद्घाटन करण्यासाठी येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतायत. असे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. 


पुण्यात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते. युक्रेन हा अतिशय सुंदर देश आहे रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही, पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. युक्रेनमध्ये कमी फी मध्ये मेडिकलसाठी प्रवेश मिळतो. इथे ९५ टक्के मार्क पडून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे साठ टक्क्यांना प्रवेश मिळतो.पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे. लिबीयातुन त्या वेळी भारतीयांना परत आणण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, ती सगळ्याना माहित आहे. संघर्षामधे आपण कोणाची बाजू घेत नाही. त्यामुळे भारत सरकारच्या याबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेबाबत टिका टिपणी करण्याची ही वेळ नाही. असे शरद पवार पत्रकार परिषदे दरम्यान बोलले, 

उद्या काही अडचण आली, तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार

 पुणे मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन कोथरूड पर्यंत होणार आहे. पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. शरद पवारांनी जलसंपदा विभाग लक्ष घालेल असं म्हटलंय नदी सुधार प्रकल्पाचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मी काही इंजीनिअर नाही. पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे. उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत. पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे.

राणे आणि मलिकांना वेगळा न्याय का?

नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्याबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. राजकिय हेतुने मलिकांना अटक केलीय. नवाब मलिक यांच्या वरील कारवाई चुकीच्या पद्धतीने झालीय. नारायण राणेंना देखील अटक झाली होती, त्यावेळी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? तसेच नारायण राणे आणि नवाब मलिकांनी वेगळा न्याय का? असा सवाल पवारांनी भाजपला केला आहे. 

 वृत्त संपादक अशोक कांबळे 

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 📞9767508972/7219500492.

YOUR REACTION?

Facebook Conversations