पोलीस, संबंधित फरार आरोपीच्या मागावर, लोकांन मध्ये असंतोष निर्माण.

 द जस्ट आज दि. १९ :- बेंगलोर-मुंबई महामार्गालगत हाॅटेल सेंन्टोसा किवळे येथे सोमवारी दि. १७ अप्रैल रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजता तुफान वाऱ्यासह पाऊस आला होता वारा पाऊसाचा बचाव करण्यासाठी १० ते १५ जण एका टायर पंचरच्या दुकाना येथे आडोशाला थांबले होते तुफान सोसाट वारा आल्याने अनधिकृत भलामोठा होर्डिंग कोसळून पाचजण ठार जागीच ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी अनधिकृत बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी जागा मालक, होर्डिंग बनवणारा, होर्डिंग भाड्याने घेणारा आणि जाहिरात देणारी कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जागा मालकाला अटक केली आहे.

जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यासह होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४ (२), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

 या दुर्दैवी घटनेत शोभा विजय टाक (वय ५०, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय ३३, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर विशाल शिवशंकर यादव (वय २०, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहमद अन्सारी (वय २१, रा. बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. काल भारती नितीन मंचल यांचा शोकाकुल वातावरणात शितळानगर शमशान भुमीत अंतिम संस्कार करण्यात आला या दुर्दैवी घटना मुळे अनेक लोकांचे अश्रू अनावर झाले होते. मृत्यू येण्यापूर्वी दोन मिनटे अगोदर भारती मंचल यांनी आपल्या पतीशी संपर्क साधला होता पतीने फोन वर विचारले की दुचाकी घेऊन येतो तर पत्नी भारतीने मनाई करत तुम्ही नका येऊ आम्ही तीन चार मैत्रीण सोबत आहे असे फोन वर सांगितले व फोन कट होताच भलामोठा होर्डिंग पडुन भारतीसह इतर चार लोकांचा दुर्दैवी अंत झाला.व तीन लोक जख्मी झाले होते. 

मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून ट्युटर व्दारे माहीत देत मृतांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपये मदत जाहीर करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी होर्डिंग बसवताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेतली नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता केली नाही. वादळे आणि मुसळधार पाऊस यांचा अंदाज असताना देखील सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता होर्डिंग लावले. मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळामध्ये होर्डिंग कोसळून त्याखाली पाचजण ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हे सर्व कामगार वादळ आल्याने होर्डिंगच्या खाली असलेल्या पंक्चरच्या दुकानात आडोशाला थांबले होते. अचानक होर्डिंग कोसळल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना पकडण्यासाठी रावेत पोलिसांनी पथके तयार केली असून जागा मालकाला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपी फरार असून आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. या गंभीर घटनेचे रावेत पोलीस तपास करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations