महाराष्ट्र मुस्लिम फ़्रंटच्या वतीने येडशी येथील गटारी चे निकृष्ठ दर्जा चे काम सुधारण्या बाबत ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन

उस्मानाबाद दि. 5सप्टेंबर (वृत्तप्रतिनिधी :-सरफराज़ पटेल )

   येडशी येथील वार्ड क्रं.६,जमादार बाबा नगर मधील गटारी चे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे गटारीतून पाणी पुढे वाहून जात नाही. तसेच पाऊस झाल्या नंतर गटारी चे घाण पाणी रसत्यावर येते . तसेच गटारीचे पाणी तुंबन  डासांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोकादायक झाले आहे  गटारी काढण्याचे काम तेथील नागरिक करत आहेत.

 तरी ह्या गटारीचा समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी .अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम फ़्रंट सामाजिक संघटना तसेच तेथील नागरिकांच्या वतीने उस्मानाबाद ग्रामपंचायती ला निवेदनाद्वारे करण्यात आली.या वेळी संबंधित अधिकाऱ्यानी लवकरात लवकर योग्यती  कार्रवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ़्रंट सामाजिक संघटना उस्मानाबाद तालुकाध्यक्ष हैदरअली पटेल ,राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष अमीन पठान,हज़रत जमादार बाबा वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष रफीक पटेल, उपाध्यक्ष मज़हर पटेल,अमीर शेख, सलाउद्दीन शेख ,जावेद सय्यद, इमरान पटेल,अहेमद पाशा शेख इत्यादि उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations